Monday, April 3, 2017

मन असं असतं
स्वतःलाच सगळं विसरायला लावतं,
मग कळत- नकळत
ते कुठेतरी जुळतं,
आयुष्याच्या नवीन वाटेवर
पाहिलं पाऊल टाकतं,
अन ते असतं " प्रेमाचं नातं ",,,,,
कुणावरी जीव जडल्यावर
हेच मन हसतं, गात, आणि त्याच्यातच गुंफत ,
" त्याच्या " आठवणीने मन हळहळत
गुपीतही गोड़ वाटू लागतं,
भेटीसाठी हि ते आतुरत......
मग एके सांजवेळी 
दोघांचं मिलन होतं,
त्या भेटीमुळे
तिला सारं विश्व गवसतं.......
कधी कधी हेच मन
 दोघांमधील दुरावा दूर करतं,
अन आयुष्याच्या सुख-दुखःसांसाठी
हेच मन साथ देतं.......
दोघांच्या गाठी जुळल्यावर
मन हि मनात हसतं !!!!!!!!!

No comments:

Post a Comment