Monday, April 3, 2017

आठवण नवीन प्रवासाची......

आज रात्री उशिरापर्यंत ब्लॉग लिहणे हे खरच खूप छान वाटले. नवीन अनुभव , नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा यामुळे खरंतर मज्जा आली,,,,,आणि त्यातूनही मी केलेल्या काही चारोळी किंवा कविता ज्या मी जास्त कुणाला वाचून दाखवल्या नव्हत्या त्या या निमित्ताने सर्वांसमोर लिहता आल्या. कशा आहेत हे मला जाणूनहि नाही घायचंय .....पण याच माझ्या साथीला होत्या जेव्हा मी एकटी  नव्याने प्रवास करायला शिकत होते...शाळेतून बाहेर पडून महाविद्यालयात प्रवेश घेतला न त्यातही आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो,,,आणि मग सुरु झाली नवीन प्रवासाला......आणि त्याच प्रवासातील  या काही आठवणी......
मन असं असतं
स्वतःलाच सगळं विसरायला लावतं,
मग कळत- नकळत
ते कुठेतरी जुळतं,
आयुष्याच्या नवीन वाटेवर
पाहिलं पाऊल टाकतं,
अन ते असतं " प्रेमाचं नातं ",,,,,
कुणावरी जीव जडल्यावर
हेच मन हसतं, गात, आणि त्याच्यातच गुंफत ,
" त्याच्या " आठवणीने मन हळहळत
गुपीतही गोड़ वाटू लागतं,
भेटीसाठी हि ते आतुरत......
मग एके सांजवेळी 
दोघांचं मिलन होतं,
त्या भेटीमुळे
तिला सारं विश्व गवसतं.......
कधी कधी हेच मन
 दोघांमधील दुरावा दूर करतं,
अन आयुष्याच्या सुख-दुखःसांसाठी
हेच मन साथ देतं.......
दोघांच्या गाठी जुळल्यावर
मन हि मनात हसतं !!!!!!!!!

Friday, March 24, 2017


जीवन 

दुसऱ्यांच्या ओठांवर हसू आणणं 

इतके सोप्प नसतं

जीवन हे जगण्यासाठी असतं 

पण जगन मात्र खूपच कठीण असतं !!!!!!